गुरुवार, ११ जून, २०२०

साने गुरुजी!


मराठी विचारविश्वात सगळ्यात महत्वाच्या काही व्यक्तींपैकी एक व्यक्तीमत्व. 

धर्म, संस्कृती, अस्पृश्यता, जातीभेद, शेतकरी-कामगार, जमातवाद, हिंसा- अहिंसा, स्त्री प्रश्न, समाजवाद अशा सगळ्यात विषयांवर सातत्याने आणि सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत गुरुजी लिहित होते. 

अनेक इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे केली. अनेकांची चरित्र लिहली. खानदेशात शेतकरी कष्टकरी जनतेचे संघटना बांधली. ग्राम स्वराज्य, जातीभेद निर्मूलन आणि हिंदू-मुस्लिम एकतेला केंद्रस्थानी ठेवून समाजवादाचे स्वप्न पाहणारे साने गुरुजी जमीनदार, भांडवलदार आणि धर्मांध- जमातवाद्यांना नेहमी आपले शत्रू वाटत होते. 

१९३० च्या दशकात साने गुरुजींनी ' कम्युनिझम आणि हिंसा ' संबंधी अत्यंत महत्वाचे दोन लेख.लिहले आहेत. स्वतः आयुष्यभर अहिंसक असलेले साने गुरुजी कम्युनिस्ट हिंसा आणि स्टेट हिंसा ह्यांच्यात फरक करतात. गांधी वर्गसमन्वयक आहेत. त्यावर वर्गसंघर्षवाद्यांनी दबाव टाकत राहीला पाहिजे असेही साने गुरुजी नोंदवतात.

शेतकरी आणि कामगार ही देशाची फुफ्फुसे आहेत. तसेच, प्रत्येक गावात ग्राम स्वराज्य, ग्रंथालय, आरोग्य मंडळ असले पाहिजे. गावात जातीभेद नसावा असेही म्हणतात. अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले करावे ह्यासाठी अनेकांचा विरोध असतांनाही साने गुरुजींनी आंदोलन केली. 

मराठी मातीत साने गुरुजी नावाचा बोधीवृक्ष कसा उगवला हे पाहायला हवे. त्यांची वैचारिक आणि सामाजिक चौकट समजून घेतली पाहिजे. 

गुरुजींचे इंग्रजी आणि मराठी असे चांगले वैचारिक आणि बौद्धिक चरित्र असायला हवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बायनरी मोडून जगाकडे पाहायला शिकले पाहिजे!

  शाळेत असतांना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या सुरुवातीला एकविसावे शतक हे विज्ञानाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे असे म्हटले जात ह...